Skip to main content

Posts

मृत्यू न म्हणे देसाई । मृत्यू न म्हणे वेवसायी । मृत्यू न म्हणे ठांईं ठांईं । पुंड राजे ।।

।। दास-वाणी ।।  मृत्यू न म्हणे देसाई ।  मृत्यू न म्हणे वेवसायी ।  मृत्यू न म्हणे ठांईं ठांईं ।  पुंड राजे ।।  मृत्यू न म्हणे मुद्राधारी ।  मृत्यू न म्हणे व्यापारी ।  मृत्यू न म्हणे परनारी ।  राजकन्या ।।  ।। जय जय रघुवीर समर्थ ।।   दासबोध : ०३/०९/१४-१५  उपजे ते नाशे ।  जे निर्माण होते ते कधी न कधी नाश पावतेच. जातस्य हि धृवो मृत्यु: ।  जन्मलाय त्याला मृत्यू अटळ आहे. मृत्यू भेदभाव कधीच करत नाही. हा गावचा देसाई आहे याला जरा नंतर नेऊ. हा तर मोठा कारखानदार आहे. हा जागोजागी गुंडगिरी करत स्वत: जणु राजाच समजतोय. याला शिक्षा म्हणून थोडे आधी नेऊया. मुद्राधारी म्हणजे शिक्काधारी राजपत्रित अधिकारी. हा लोकांच्या उपयोगी पडतोय.दया दाखवूया याला. हा धनाढय व्यापारी आहे. याच्या जाण्याने मोठा कारभार ठप्प पडेल. ही परस्त्री आहे. ही तर राजकन्या आहे. हिला हात कसा लावायचा ? असा कोणताही भेदभाव मृत्यू कधीच करत नाही. सरतां संचिताचे शेष ।  नाहीं क्षणाचा अवकाश ।।  प्रारब्धाचे ठरलेले चांगले वाईट भोग संपले, की क्षणाचाही वेळ जा...

नीती सांडूनियां तत्वतां । करूं नये तेंचि करितां । येमयातना भोगिता । जीव जाये ।।

।। दास-वाणी ।।  नीती सांडूनियां तत्वतां ।  करूं नये तेंचि करितां ।  येमयातना भोगिता ।  जीव जाये ।।  डोळे झांकून स्वार्थबुद्धी ।  नाना अभिळाश कुबुद्धी ।  वृत्ति भूमिसिमा सांधी ।  द्रव्य दारा पदार्थ ।।  ।। जय जय रघुवीर समर्थ ।।   दासबोध : ०३/०८/०५-०६  शुभ अशुभ कर्मानुसार स्वर्ग सुख किंवा  नरकयातना भोगाव्या लागतात. मृत्यूनंतर जीवाला भोगावे लागणारे दु:ख  म्हणजे आधिदैविक ताप होत. नीती म्हणजे धर्माचा कायदा. तो ईश्वरनिर्मित असल्याने त्यात वारंवार  आपल्या सोयीनुसार आणि मर्जीनुसार  बदल अथवा दुरूस्ती करता येत नाही. नीतीतत्वे सोडून जे वर्तन घडते ते अनीती म्हणायचे. नेमक्या नको त्याच गोष्टी हातून घडतात. स्वार्थी वृत्तीने योग अयोग्याकडे डोळेझाक होते. अनेक अभिलाषा मनात निर्माण होतात. सद् बुद्धी लोप पावते. कुबुद्धी देहाचा ताबा घेते. साहजिकच स्वैराचारी वर्तन सुरू होते. दुसऱ्याची जमीन हडप करणे, वस्तूंची पळवापळवी, स्त्री किंवा संपत्ती बळकावणे  अशा पापात्मक गोष्टी घडतात. कर्मविपाकाच्या सिद्धांतानुसार  याच...

पुढें गेला विदेशासी । प्राणी लागला व्यासंगासी । आपल्या जिवेसीं सोसी । नाना श्रम ।।

।। दास-वाणी ।।  पुढें गेला विदेशासी ।  प्राणी लागला व्यासंगासी ।  आपल्या जिवेसीं सोसी ।  नाना श्रम ।।  ऐसा दुस्तर संसार ।  करितां कष्टला थोर ।  पुढें दोनी च्यारी संवत्सर ।  द्रव्य मेळविलें ।।  ।। जय जय रघुवीर समर्थ ।।   दासबोध : ०३/०५/०१-०२  माझ्याच मुलाबाळांची हौस मी तुटपुंज्या  पगारात भागवू शकत नाही. त्यांना दु:खी झालेले मी पाहू शकत नाही. म्हणून खिन्न होऊन, मान खाली घालून   घरदार, पत्नी आणि मुले यांना सोडून  अधिक धनप्राप्तीसाठी तो दूर देशी निघून गेला. परदेशात गेल्यावर तो झपाटून कामाला लागला. जिवाची पर्वा न करता त्याने अहोरात्र काबाडकष्ट केले. संसाराचा आपणच वाढवलेला गाडा  ओढण्यासाठी अपार कष्ट केले. बायको मुलांची सतत येत असलेली आठवण  त्याने काळजावर दगड ठेवून सोसली. दोन चार वर्षे प्रचंड मेहनत करून पुष्कळ  धनदौलत मिळवली. एकटा उपभोग घेणार किती आणि कसा ?  कुटुंबियांच्या ओढीने सगळे जमवलेले द्रव्य  घेऊन तो आता ताठ मानेने स्वदेशी परतला. निघताना तो दु:खी होता. परतताना तो अत्यंत...

भरम आहे लोकाचारीं । पहिली नांदणूक नाहीं घरीं । दिवसेंदिवस अभ्यांतरीं । दरिद्र आलें ।।

।। दास-वाणी ।।  भरम आहे लोकाचारीं ।  पहिली नांदणूक नाहीं घरीं ।  दिवसेंदिवस अभ्यांतरीं ।  दरिद्र आलें ।।  ऐसी घरवात वाढली ।  खातीं तोंडें मिळालीं ।  तेणे प्राणीयांस लागली ।  काळजी उद्वेगाची ।।  ।। जय जय रघुवीर समर्थ ।।   दासबोध : ०३/०४/०५-०६  यांचे आई वडील गर्भश्रीमंत होते. प्रचंड धनदौलत,  मानमरातब राखून होते.लोकांमधे प्रतिष्ठा होती. त्यामुळे हे कुटुंबही संपन्न जीवन जगत असावे, असा भ्रम समाजात होता. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती अगदीच विरूद्ध होती. उत्पन्न दिवसेंदिवस खालावत होते. खर्च मात्र काही केल्या कमी होईना. साहजिकच घरावर दारिद्र्याची कळा आलेली. घरातला व्याप वाढला . वर्दळ तितकीच राहिली. खाणारी तोंडे आणि त्यांची भूक वाढतच चालली. लेकुरें उदंड जालीं ।  तो ते लक्ष्मी निघोन गेली ।  वाढत्या गरीबीची चिंता दोघा नवराबायकोला  आता वाटू लागली. हातातोंडाशी गाठ पडेना, उपासमार होऊ लागली. प्रपंचाचा आत्यंतिक उबग आला. परंतु पर्यायच नव्हता.  अविचाराने आपणच वाढवलेला कुटुंबकबिला  आता यक्षप्रश्न बनून समोर ...

नीती सांडून मागें । अनीतीनें वर्तो लागे । गर्व धरून फुगे । सर्वकाळ ।।

।। दास-वाणी ।।  नीती सांडून मागें ।  अनीतीनें वर्तो लागे ।  गर्व धरून फुगे ।  सर्वकाळ ।।  पूर्वजांस सिंतरिलें ।  पक्षश्राद्धहि नाहीं केले ।  कुळदैवत ठकिलें ।  कोणेपरी ।।  ।। जय जय रघुवीर समर्थ ।।  दासबोध : ०३/०३/०८-०९  संसारात अडकलेला प्रपंचात गुरफटलेला  बद्ध जीव भौतिक सुखामधे लोळत असतो. त्या नश्वर सुखामागे धावता धावता नीतीचा  मार्ग बाजूला पडतो. अनीती अनाचार हेच त्याचे कायमस्वरूपी  वर्तन राहाते.  संपत्ती आणि वैभवाचा त्याला गर्व चढतो. समृद्धीच्या गर्वाने तो फुगून जातो. मग नित्य नैमित्तिक कर्मे त्याला गौण वाटू लागतात. ज्यांच्यामुळे नावलौकिक मिळाला त्या पूर्वजांचा विसर पडतो. त्यांच्या आत्म्याच्या उत्तम गतीसाठी केली जाणारी  श्राद्धकर्मेही टाळली जातात.  कुलदैवत कुळाचार तर अडगळीतच टाकले जातात.  या बद्ध जीवाला आपण बांधले गेलो आहोत  हे देखील स्वार्थापोटी समजत नाही.  पारमार्थिक उन्नतीची त्याला आवश्यकताही   वाटत नाही. देहाचे लाड हेच जीवन असे मानणारे  बद्ध बहुसंख्यांक आह...

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Blogs

Total Pageviews